आजकाल ना मला कसली कसली स्वप्न पडतात. स्वप्नात मी हवेत तरंगत असते, एकदम हलकीफूल होउन, मखमली पंख मिळतात मला. सुखावणारा वारा असतो, हवा जिकडे नेईल तिकडे उडत जाते.
स्वप्नाचा काय अर्थ असेल तो असेल. चांगलाच असेल. मला सांगायचंय असं की मी आता खुश असते ना स्वतःवर. Happy contended वगैरे.
हे व्हायला लागलं ह्या जेमतेम सात आठ महिन्यांच्या अवधित. रूढ़ार्थानी प्रेमात न पडल्यामुळे पछाड़ल्यासारखं नाहीच झालं कधी. खरंच सांगते, सुरुवातीला चाहूलसुध्दा नव्हती मला.
त्यामुळे तुझ्या प्रेमात पडल्याचं कळलं तेव्हा ती माझ्यासाठीसुद्धा breaking news च होती.
पाहुया काय होतंय, असा बेफ़िकीर विचार होता. पण नंतर शहाणपण सुचलंच नाही. 'कंट्रोल' मधे राहिलंच नाही काही.
हलक्या पावलांनी आलास आणि भिनतच गेलास. तुझा आवाज, स्पर्श, गंध, नजर, शब्द सगळं सगळं सामावलं जातंय हळूवार. अतिशयोक्ति वाटते तुला?
अगदी आयुष्य नाही पण मी नक्कीच बदलले आहे. तुझ्यामुळे. तुला जाणवतं का हे? अशी जमिनीपासून चार बोटं वर तरंगत असते ते तुझ्यामुळेच. कुठलीही नशा न करता! अलवार माझ्याही नकळत.
हे सगळं खरं घडतंय की स्वप्न पाहतिय मी?
उगीच नाही हळवी होत मी हे सगळं सांगताना. वाटतं याआधी का नाही भेटलास तू? कुठे होतास? नुसती ओळखत होते मी तुला, पाहिलं होतं अनेकदा, पण "click" व्हायला पाच वर्ष जावी लागली. तब्बल पाच! तेदेखिल तू पुढाकार घेतल्यावर!
मला कळत नाही ते हेच. तू उशिरा भेटलास मला म्हणून अफ़सोस करू की भले उशिरा का होईना पण आयुष्यात आलास माझ्या याबद्दल "हरकत नाही" मोड वर जाऊ?
असंही वाटतं कधीकधी की आत्ता उशिरा भेटलास तेच बरं झालं ना, कारण आपण भेटलो तोपर्यन्त आपली आयुष्य मार्गी लागली होती. तू 'माझा' होण्याची दूरपर्यन्त शक्यता नाही त्यामुळे तुला गमवायची भीतीदेखील नाही.
म्हणून अफ़सोस नाही, उलट स्वतःचंच कौतुक करून घ्यावं म्हणते. तुझ्याबरोबर इथपर्यन्त आल्याचं कौतुक. एकदम बड़ी बात!
तुझं नाव त्या दिवशी लिहिताना, कशाला डोक्यात आलं असतं की याच्यामुळे माझं आयुष्य बदलणार आहे. किती वेळा लिहिलं, गिरवलं, उच्चारलं. तुझ्याबद्दलच्या ऐकिव गोष्टींची उजळणी केली. तू कसा असशील याबाबत अंदाज बांधले.
तुझ्याभोवती घुटमळले, बेहकले, हरवून गेले आणि नव्यानी सापडलेसुद्धा. कितीतरी आढेवेढे, विनावण्या, हरकती आणि समजूती.. इतकं झगडून शरण येऊन माझं काही उरलंच नाहीये.
कविकल्पना आहे ना "मी न माझी राहिले " types. खरी असणार ती.
काही राहिलं असेलच माझं, तर तो वेडेपणा तेवढा माझा असेल. बाकी सगळं तुझंच.
स्वप्नाचा काय अर्थ असेल तो असेल. चांगलाच असेल. मला सांगायचंय असं की मी आता खुश असते ना स्वतःवर. Happy contended वगैरे.
हे व्हायला लागलं ह्या जेमतेम सात आठ महिन्यांच्या अवधित. रूढ़ार्थानी प्रेमात न पडल्यामुळे पछाड़ल्यासारखं नाहीच झालं कधी. खरंच सांगते, सुरुवातीला चाहूलसुध्दा नव्हती मला.
त्यामुळे तुझ्या प्रेमात पडल्याचं कळलं तेव्हा ती माझ्यासाठीसुद्धा breaking news च होती.
पाहुया काय होतंय, असा बेफ़िकीर विचार होता. पण नंतर शहाणपण सुचलंच नाही. 'कंट्रोल' मधे राहिलंच नाही काही.
हलक्या पावलांनी आलास आणि भिनतच गेलास. तुझा आवाज, स्पर्श, गंध, नजर, शब्द सगळं सगळं सामावलं जातंय हळूवार. अतिशयोक्ति वाटते तुला?
अगदी आयुष्य नाही पण मी नक्कीच बदलले आहे. तुझ्यामुळे. तुला जाणवतं का हे? अशी जमिनीपासून चार बोटं वर तरंगत असते ते तुझ्यामुळेच. कुठलीही नशा न करता! अलवार माझ्याही नकळत.
हे सगळं खरं घडतंय की स्वप्न पाहतिय मी?
उगीच नाही हळवी होत मी हे सगळं सांगताना. वाटतं याआधी का नाही भेटलास तू? कुठे होतास? नुसती ओळखत होते मी तुला, पाहिलं होतं अनेकदा, पण "click" व्हायला पाच वर्ष जावी लागली. तब्बल पाच! तेदेखिल तू पुढाकार घेतल्यावर!
मला कळत नाही ते हेच. तू उशिरा भेटलास मला म्हणून अफ़सोस करू की भले उशिरा का होईना पण आयुष्यात आलास माझ्या याबद्दल "हरकत नाही" मोड वर जाऊ?
असंही वाटतं कधीकधी की आत्ता उशिरा भेटलास तेच बरं झालं ना, कारण आपण भेटलो तोपर्यन्त आपली आयुष्य मार्गी लागली होती. तू 'माझा' होण्याची दूरपर्यन्त शक्यता नाही त्यामुळे तुला गमवायची भीतीदेखील नाही.
म्हणून अफ़सोस नाही, उलट स्वतःचंच कौतुक करून घ्यावं म्हणते. तुझ्याबरोबर इथपर्यन्त आल्याचं कौतुक. एकदम बड़ी बात!
तुझं नाव त्या दिवशी लिहिताना, कशाला डोक्यात आलं असतं की याच्यामुळे माझं आयुष्य बदलणार आहे. किती वेळा लिहिलं, गिरवलं, उच्चारलं. तुझ्याबद्दलच्या ऐकिव गोष्टींची उजळणी केली. तू कसा असशील याबाबत अंदाज बांधले.
तुझ्याभोवती घुटमळले, बेहकले, हरवून गेले आणि नव्यानी सापडलेसुद्धा. कितीतरी आढेवेढे, विनावण्या, हरकती आणि समजूती.. इतकं झगडून शरण येऊन माझं काही उरलंच नाहीये.
कविकल्पना आहे ना "मी न माझी राहिले " types. खरी असणार ती.
काही राहिलं असेलच माझं, तर तो वेडेपणा तेवढा माझा असेल. बाकी सगळं तुझंच.
No comments:
Post a Comment